• Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी निबंध
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • गुरु पौर्णिमा मराठी निबंध Guru Prunima Essay
  • फादर्स डे निबंध Father's Day Essay
  • राजमाता जिजाऊ निबंध मराठी Rajmata Jijau Nibandh
  • बैसाखी 2022 मराठी निबंध : शीख लोकांचा नववर्ष 'बैसाखी '
  • होळी निबंध Holi Essay

पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

marathi essay writing on rainy season

  • वेबदुनिया वर वाचा :
  • मराठी बातम्या

Raksha Bandhan Rakhi Muhurat 2024: रक्षाबंधनाला राखी बांधण्याची शुभ मुहूर्त कोणता?

Raksha Bandhan Rakhi Muhurat 2024: रक्षाबंधनाला राखी बांधण्याची शुभ मुहूर्त कोणता?

2024 हरतालिका तृतीया कधी आहे ? तिथी जाणून घ्या

2024 हरतालिका तृतीया कधी आहे ? तिथी जाणून घ्या

जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता - ग्राऊंड रिपोर्ट

जम्मू सीमेजवळील हल्ल्यांमध्ये नवा पॅटर्न, हल्लेखोर काही वेळातच होतात बेपत्ता - ग्राऊंड रिपोर्ट

Evil Eye Remedy दृष्ट लागल्यास हा समस्यांना सामोरा जावं लागतं, उपाय जाणून घ्या

Evil Eye Remedy दृष्ट लागल्यास हा समस्यांना सामोरा जावं लागतं, उपाय जाणून घ्या

Mpox काय आहे? महाराष्ट्रात आढळणाऱ्या माकडतापाशी त्याचं साधर्म्य आहे का?

Mpox काय आहे? महाराष्ट्रात आढळणाऱ्या माकडतापाशी त्याचं साधर्म्य आहे का?

अधिक व्हिडिओ पहा

marathi essay writing on rainy season

मुलांच्या छातीत जमा झालेला कफ या घरगुती उपायांनी दूर करा

मुलांच्या छातीत जमा झालेला कफ या घरगुती उपायांनी दूर करा

काही मिनिटांत बनवा ब्रेड आणि पनीरचा चविष्ट नाश्ता मसाला फ्रेंच टोस्ट

काही मिनिटांत बनवा ब्रेड आणि पनीरचा चविष्ट नाश्ता मसाला फ्रेंच टोस्ट

रक्षाबंधनला भावासाठी बनवा कोको ऑरेंज बाइट रेसिपी

रक्षाबंधनला भावासाठी बनवा कोको ऑरेंज बाइट रेसिपी

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

जास्त खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपल्या खाण्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ते जाणून घ्या

जास्त खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपल्या खाण्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ते जाणून घ्या

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

marathi essay writing on rainy season

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 3, 2023 | शिक्षण

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi ) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | marathi months name, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Essay in Marathi | Pavsala Essay In Marathi

तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो पावसाळा मराठी निबंध (Essay on rainy season in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

Rainy Season Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "पावसाळा" किंवा " वर्षा ऋतू" मराठी निबंध.

  • पावसाळा मराठी निबंध
  • पावसाळा मराठी निबंध PDF

पावसाळा मराठी निबंध 

पाऊस किती लहरी ! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय ! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते, कोण जाणे ! जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते.  पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करीत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.

एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. ' आला, आला, पाऊस आला !' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला, तसा अचानक थांबला.

केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टबटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! असा हा किमयागार पहिला पाऊस !!

पावसाळा मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

धन्यवाद तुम्हाला पावसाळा मराठी निबंध ( Rainy Season Essay in Marathi ) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझे आवडते शिक्षक निबंध

माझे बालपण निबंध

माझी आई निबंध मराठी मधे

You might like

Post a comment, contact form.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi

पाऊस ऋतू हा माझा आवडता ऋतू आहे.

पाऊस हा एक अत्यंत रमणीय आणि रसिकांच्या मनात जगणारा ऋतू आहे.

ह्या ऋतूतले सर्वात मोठे लाभ आहे कारण हे ऋतू देशात पाणी घेऊन आले त्यानंतर प्राणिजगात परिणामी फळे होतात.

या ब्लॉग पोस्ट मध्ये, आपल्याला मला आवडता पाऊसाचा सुंदर स्वरूप आणि त्याच्या अद्भुततेचे वर्णन मिळेल.

ह्या पाऊसाच्या ऋतूच्या बाबतीतील माझे अनुभव, त्याच्या विशेषतेचे वर्णन आणि अनेक माणसांना कसे आवडते हे सर्व मला तुम्हाला ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये विचारले जाईल.

अशाच अद्भुत आणि रसिकांच्या मनात जगणार्‍या पाऊसाच्या ऋतूच्या बाबतीतले विचार वाचून, आपल्या मनाला आनंदीत करण्यास सज्ज राहा!

माझ्या प्रिय ऋतू: पाऊस

सर्व ऋतुंमध्ये पाऊस हा एक अत्यंत विशेष आणि आवडता ऋतू आहे.

पाऊसात भरलेल्या गवताने आपल्याला अनगिण्य संवेदना आणि अनुभव देतात.

पाऊस: एक अद्भुत स्वरूप

पाऊस हा देवाची वर्षा आहे.

या ऋतूतला माझ्या हृदयाला अत्यंत प्रिय आणि प्रियांच्या सोप्प्या अनुभवांचे दर्शन होते.

मला पाऊसातल्या विविध दृश्यांची संख्या, वातावरणाचे बदलते रंग, आणि प्राकृतिक सौंदर्याची शक्ती खूप आवडते.

पाऊस स्वभावतः धरणारा उष्णतेचा सुरक्षा देणारा असून, आपल्याला सुगंध, स्वच्छता आणि ताज्या वातावरणाची भाग्यवत वाटणारा अनुभव मिळतो.

पाऊसाच्या संग्रहातील अनुभव

माझ्या जीवनात, पाऊस वेगवेगळ्या अनुभवांचा संग्रहाचा केंद्र आहे.

एका अनुभवात, मी झाडांच्या पायांना घेऊन आलेल्या पाऊसाच्या पाण्यात संतत केलेल्या दृश्याचा सुख मानलो.

इतरा अनुभव जसे की घरात बसलेल्या गवताने पाऊसाच्या गरजाचा आनंद घेतला, किंवा एक मित्रांसह बारामातल्या भेटीसाठी निघालेल्या अनुभवाचा आनंद ग्रहण केला.

पाऊसाच्या सारखी निराकरणीयता

पाऊसाच्या संदर्भात, मी एक सुरेख अविश्वास अनुभवला आहे.

यात, जो कुणीही पाऊसाच्या ऋतूचा आनंद न घेतो, तो अविश्वासाचा केंद्र बनू शकतो.

हा ऋतू वास्तविकतेत आपल्या जीवनात अनगिण्य संदेशांचे आणि संवेदनांचे आकारदार आहे.

पाऊसाच्या लेखकांची आणि लोकांची विचारणा

अद्भुत व्यक्तिमत्त्वे, विचारणांची आणि अनुभवांची वाचवून घेण्यासाठी, आपल्याला थोडक्यात अनुभवी व्यक्तिंच्या विचारांची जाण घेण्याची आवश्यकता आहे.

पाऊसाच्या विषयी विचार करताना, मी प्रमुख लोकांच्या मतांना आणि विचारांना स्त्रोत करण्यासाठी विविध पुस्तके, लेखके आणि कविता समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.

त्यांमध्ये असे उद्धरण आहेत ज्यातून हा सौंदर्य आणि महत्व मिळालं आहे.

उदाहरणार्थ, लावणी कविता:

"वर्षा आली, पाऊस आला, नृत्य करूया जगला भरलं,पावसात ओवाळलं, मन हर्षाने भरलं।"

एक महान व्यक्तिचे उद्धरण:

"पाऊस आला, दृष्टींत स्वच्छता आणि ताज्या वातावरणाची भाग्यवत वाटते." - Rabindranath Tagore

संपर्क

पाऊसाच्या ऋतूतला आणखी कुणीही अधिक आवडत नसल्यास, तो माझ्या हृदयात एक विशेष आणि प्रिय अनुभव आहे.

या निबंधात, मी आपल्या सोबत साझा केलेल्या पाऊसाच्या संग्रहांचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या अनुभवांचा आपल्याला आवडला का? त्याबद्दल आपल्या अनुभवांना माझ्या संपर्कांत सामायिक करा.

आपला आभार,

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 100 शब्द

पाऊस हा माझ्या प्रिय ऋतू आहे.

पाऊसामुळे प्रकृती अत्यंत सुंदर वाटते.

झाडं आणि भूमी पाण्याने ताज्या आणि हिरवी होतात.

पाऊसात घरात बसून उचलणे, छायेत बैठणे आणि गरम चहा पिणे अत्यंत आनंददायक असते.

पाऊसात भिजणारे क्षण, भीगते हवामान आणि मिठास अद्याप आमच्या अवघ्या जगात राहून जाते.

पाऊस एक संदेश देते, असे जे प्राकृतिक सौंदर्य आणि जीवनाची सार्थकता वाटते.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 150 शब्द

घरात बसून उचलणे, झाडं आणि भूमी पाण्याने ताज्या आणि हिरवी होतात.

पाऊसाच्या गरम चहाच्या साथी बैठणे अत्यंत आनंददायक असते.

पाऊसाचे पाणी नद्या आणि तालुक्यांच्या अचूक धरणांना भरून देते.

प्राकृतिक सौंदर्यात भरपूर आनंद मिळतो.

पाऊस हा आनंदाचा आणि नवसंवत्सराचा संदेश देतो.

एक सर्वांगीण ऋतू म्हणून पाऊसाची खासीतत्त्वं आपल्या जीवनात महत्वाची असते.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 200 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी एक आहे.

पाऊस या ऋतूतला माझ्या हृदयात स्थान आहे.

पावसाचे पाणी नद्या आणि झरे भरून देते, ज्यामुळे प्रकृती सजली वाटते.

पाऊसात भिजणारे क्षण, भीगते हवामान आणि मिठास अद्याप आमच्या जगात राहून जाते.

पाऊसाच्या ऋतूत मला घरात बसून उचलण्याची आणि धुंदात बाराची धडक ऐकण्याची अद्वितीय आनंद मिळते.

त्यामुळे ह्या ऋतूतल्या सगळ्यांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.

पाऊसाच्या दिवसांत घरी बारीक अंतरंग पडलेले असते.

झाडं आणि फुले प्राणी आणि पक्ष्यांच्या खेळाचे साक्षात्कार करतात.

पाऊसाच्या दिवसांत उष्णता वाढते, प्रकृती सर्व रंगात चमकते आणि नवे जीवनाचे रंग येते.

या कारणाने, पाऊस माझ्या आवडत्या ऋतूंमध्ये एक आहे.

या ऋतूतला माझं मन आनंदाने भरतं, त्यामुळे पाऊस हा माझ्या जीवनात अत्यंत महत्वाचा असा एक भाग आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 300 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी सर्वात आनंदकारक आणि विशेष आहे.

पाऊस संपूर्ण प्रकृतीला नवे जीवन देतो.

ह्या ऋतूत भारतात लोकांना बहरून घेणारा सगळा प्राकृतिक सौंदर्य भरपूर मिळतो.

झरे, नद्या, वाहतुकी, वनस्पतींची आणि प्राणींची नवीन चमक, सर्व काही पाऊसात दिसते.

पाऊसात घरात बसून उचलणे, छायेत बैठणे, गरम चहा पिणे - ह्यामुळे मनाला आनंद होतो.

वृक्षांची लाट भिजण्याचे, धरणांच्या ओसरण्याचे, प्राण्यांची भेट, सगळं पाऊसात आनंददायक असतं.

पाऊसाच्या दिवसांत भिजत राहणे हे किती छान असते.

गरमीनंतर पाणीने भरलेले धरण, नद्या ह्यातून वाहतुकीची संपूर्ण जीवनधारा चलते.

पाऊसात नवं जीवन सुरू होतं, वनस्पतींची अधिक वृद्धी होते, प्राण्यांची वाट असते.

पाऊस म्हणजे नवीन उमेद, नवीन सुरवात.

ह्या ऋतूतली सागरं, पुन्हा नवीन संभावनांचं उद्याचं साक्षात्कार करून घेतं.

पाऊसाचं रंग व गंध वाचून शांततेचं आणि सुखाचं अनुभव करून आपलं जीवन समृद्ध करावं.

तसेच, पाऊस हा माझ्या जीवनात एक अद्वितीय स्थान आहे, ज्याला मी प्रत्येक वर्षी अत्यंत आनंदाने स्वागत करतो.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध 500 शब्द

पाऊस हा माझ्या आवडत्या ऋतूंपैकी सर्वात मनमोकळा आणि प्रिय आहे.

पाऊसाचे पाणी पृथ्वीला नवे जीवन देते.

ह्या ऋतूत भारतात लोकांना बहरून घेणारा सर्वात प्राकृतिक सौंदर्य भरपूर मिळतो.

पाऊस या ऋतूतला मला सर्वांत प्रिय आणि मनमोहक म्हणून मनात राहतं.

पाऊसात बऱ्याच आनंदांची, सुखांची आणि आनंदाची अनुभवे होते.

पाऊसात विविध रंग, सुंदर दृश्ये, अद्भुत सुगंधे आणि ध्वनी वाहतात.

पाऊसाच्या दिवसांत आकाशात घाणं वाहतं, पाण्याची पायांत दृष्टी गेलं, वनचरांच्या आवाजांनी आपला मन मोहित होतो.

पावसाने गाव, तलाव, नद्या सर्वत्र जगभरात नवे जीवन घेतले वाटतात.

पाऊसाच्या दिवसांत बारीक ओस, मिटार्यांचं संगीत, वनस्पतींची गरज, पाण्याचं तरंगांचं आनंद, भूसंपर्काचं रंगबिरंगा अद्भुततेचं अनुभव आहे.

पाऊसात अधिक घालण्यासाठी बहुतेक लोक ऊस, मद, दलिंग घेतात, ज्यामुळे अनेक जनता साधारण आनंदाची सजीव आनंदाने भरतात.

सर्वात महत्वाचं, पाऊस असंतुष्टी व बाध्यता सोडतं, व्यक्ती साधारण आनंदाने त्याचा आनंद घेतो.

संदर्भानुसार, पाऊस हा अत्यंत सार्थक आणि मनमोहक ऋतू आहे.

ह्यातले सुंदर दृश्य, गंध, आणि ध्वनी जगातल्या सर्वात मनमोहक प्राकृतिक सौंदर्यात म्हणजे अत्यंत निरोप आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 5 ओळी निबंध मराठी

  • पाऊसात सर्वात आनंदकारक असतं.
  • गरमीच्या काळात जळलेलं वातावरण सुखद आणि राहुणायक.
  • पावसात भिजत राहणे, वनस्पतींची वृद्धी, आणि छायाची ताजगी मनाला आनंदित करतात.
  • निरंतर बरसणाऱ्या पाण्याच्या झरांमुळे भूमि हरित आणि भरपूर जीवनाची उत्पत्ती होते.
  • पाऊसातल्या विविध रंगांची आणि मिठासभरीत गंधांची संगती माझ्या आत्म्यात सजवलेली आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 10 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत मनाला अत्यंत आनंद होतो.
  • पाऊस आल्याने प्रकृतीची सजीवता वाढते.
  • झाडं, फुले, आणि गावांची शोभा पाऊसात प्राणित होते.
  • पाऊसाच्या धरणांत नाचणं आणि गाणं होतं.
  • पाऊसात घरी बसून उचलणं आणि गरम चहा पिणं आनंददायक असतं.
  • भिजण्यात आलेल्या मिटार्यांचं मंद हलकं, वातावरण शांत होतं.
  • पाऊसाच्या ऋतूत भूमी भरभरून दिसते.
  • पाऊसाच्या दिवसांत सागर विशेष चमकतो.
  • गरमीनंतर धुंद वाचते आणि हवामान मनमोकळा होतो.
  • पाऊस हा माझ्या जीवनात सर्वात मनमोकळा आणि प्रिय ऋतू आहे.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 15 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत माझ्या हृदयात स्थान आहे.
  • पाऊसात घरी बसून उचलणे आणि छायेत बैठणे अत्यंत आनंददायक आहे.
  • नाचणं आणि गाणं ह्या ऋतूतल्या विशेषत्वांचा भाग आहे.
  • पाऊसाच्या धरणांत बहरलेल्या ओसांना वातावरण ताजगी आणि सुंदरता देते.
  • झाडं आणि फुलं पाऊसाच्या पाण्याने ताजे आणि हिरवे होतात.
  • पाऊसाच्या दिवसांत धरणांच्या ओसांत मिटार्यांचं मंद हलकं होतं.
  • पाऊसाच्या दिवसांत गरम चहा पिणे आणि पक्षींच्या गाण्याचं आनंद मनाला देतात.
  • पाऊसात भिजत राहणे, वनस्पतींची वृद्धी आणि प्राणींची भेट अत्यंत सुंदर असते.
  • धरणांच्या पाण्याने भरलेलं धरण प्राकृतिक सौंदर्याने भरपूर आहे.
  • पावसाचं रंग आणि गंध मनाला आनंदाने भरतं.
  • पाऊसाच्या दिवसांत वनस्पतींची लाट अधिक सुंदर वाटते.
  • पाऊसात भिजणारं आकाश आणि धरण सर्वत्र नवा जीवन साकारतात.
  • गरमीनंतर आणि उष्णतेनंतर पावसाने मनाला राहत आणि शांती देते.
  • पाऊस हा माझ्या जीवनात अत्यंत महत्वाचा आणि प्रिय ऋतू आहे.
  • पावसातल्या दिवसांत आनंदाने भरलेलं मन, वातावरण आणि प्राकृतिक सौंदर्य माझ्या हृदयात आनंदीत असतात.

माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू 20 ओळी निबंध मराठी

  • पावसाच्या ऋतूत माझ्या हृदयात सर्वाधिक स्थान आहे.
  • पावसाच्या दिवसांत घरी बसून उचलणे आणि गरम चहा पिणे मनाला आनंदित करतात.
  • पाऊसात गरमीच्या काळात आकाश बरसतो, ज्यामुळे हवामान शांत असते.
  • पाऊसाच्या दिवसांत बहरलेल्या ओसांना वातावरण ताजगी आणि सुंदरता देते.
  • पावसात भिजणारं मिटार्यांचं मंद हलकं होतं.
  • पाऊसाच्या ऋतूतल्या रंगांनी भूमीला सजवलेली सजीवता आहे.
  • पावसाच्या दिवसांत आकाशात आणि भूमीवर आनंददायक दृश्ये असतात.
  • पावसाच्या दिवसांत मन अत्यंत ताजेत असतं, त्यामुळे पावसातला स्थान माझ्या जीवनात विशेष आहे.

पावसाचा माझ्या आवडत्या ऋतूत एक विशेष स्थान आहे.

या निबंधात आम्ही पाहिलं की पावसाच्या ऋतूत अनेकांना आनंद, संतोष आणि नवीन ऊर्जा देतो.

पावसाच्या दिवसांत वनस्पतींची वृद्धी, प्राण्यांची भेट, आणि प्रकृतीचं सौंदर्य ह्याची एक उत्कृष्ट दृष्टी आहे.

या निबंधात आम्ही पाहिलं की पावसाच्या ऋतूत अनेक गोष्टी संपली जातात.

पावसाच्या दिवसांत आनंदीत असण्याचं एक अनुभव सर्वांसाठी अनिवार्य आहे.

तसेच, ह्या निबंधात माझं मन आणि आत्म्यात पावसाचं विशेष स्थान आहे, ज्याला मी प्रत्येक वर्षी आनंदाने स्वागत करतो.

पावसाचं आनंद माझ्या मनाला स्थानांतरित करतं, आणि त्याच्यात सर्वांसाठी एक विशेष अर्थ आहे.

त्यामुळे, 'माझं आवडतं ऋतू - पावसाचं' हा निबंध माझ्या जीवनातलं एक अत्यंत महत्वाचं आणि प्रिय अनुभव दर्शवितो.

Thanks for reading! माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

Nibandh shala

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ ऋतूंचा देश ” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडीचा असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.

Table of Contents

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (१०० शब्दात)

Essay on rainy season in marathi

भारत देशामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. मलाही पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

या ऋतूमध्ये दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो.

प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. पशु – पक्षी, झाडे झुडपे सर्वजण या पावसात न्हावून निगतात. सगळीकडेच खूप आनंदाचे वातावरण असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात)

मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. याचे कारण म्हणजे मला पावसामध्ये भिजायला खूप आनंद मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात मी सतत भिजत उड्या मारून माझा आनंद व्यक्त करत असतो.

पण यामुळे मला कित्येक वेळा सर्धी देखील होते. पण मला याची काहीच फिकीर नसते. मी तरीसुद्धा पावसाळ्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो.

पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा हा ऋतू असतो. त्यामुळे सर्वत्र उन असते आणि प्रत्येक ठिकाणी खूप गर्मी देखील होत असते. या दिवसात तापमान पन्नासी गाठते. वातावरण खूप तापलेले असते. जीवाची अगदी लाही लाही होत असते. शिवाय सर्वत्र पाणी टंचाई ही देखील एक मुख्य समस्या असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटते लवकर पाऊस पढावा आणि वातावरणातील गर्मी निघून जावी. वातावरण अगदी थंड होऊन जावे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. यासाठी प्रत्येक मनुष्य पावसाची आत्मत्तेणे वाट पाहत असतो.

केवळ मनुष्यच नव्हे अगदी पशू पक्षी देखील या गर्मीला त्रासलेले असतात. ते देखील पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत असतात. कोकिळा त्याच्या मंजुळ आवाजात पाऊस पडावा यासाठी गायन करत असतो. शिवाय त्याच्या संगतीला सुंदर मयुरनृत्य करणारा मोर देखील साथ देत असतोच की.

भारत देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. यात संपूर्ण धरती नहावून निघते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील गर्मी निघून जाते आणि वातावरण थंड आणि आल्हादायक बनते. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (३०० शब्दात)

भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.

मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.

मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.

पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.

पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.

पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.

हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.

पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (५०० शब्दात)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. नदी, तलाव, धरणे ही जरी शेतीला वापरण्यात येणारी पर्यायी स्रोत असली तरी ते संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात यातील देखील पाणी आटते.

त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शेतकऱ्याला फार पाणी टंचाई जाणवते. पाण्यावाचून शेतातील पिके कोलमडून पडतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी राजा पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. तो आकाशाकडे डोळे लावूनच असतो, कधी पाऊस पडेल याची वाट पाहत?

केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक, पशू पक्षी, झाडे वनस्पती, नद्या, नाले, तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनच पाणी टंचाई जाणवत असते. सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या असते.

अशा वेळेस सगळ्यांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन मिर्गाच्या तोंडाला म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते. यामध्ये संपूर्ण धरती माय न्हावुन निघते.

वातावरणातील उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जाते. नद्या नाले तुंभ भरून वाहू लागतात.झाडे झुडपे, वेली वनस्पती सर्वजण या पावसात मनसोक्त भिजतात. सगळीकडेच आनंद पसरतो.

पहिल्या पावसाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सुंदर वास सुटतो. हा मातीचा वास मला खूप आवडतो. कोकिळा, चातक यासारख्या पक्ष्यांची तहान भागते. मोर पक्षी हर्षाने टेकडीवर जाऊन मयुर्नृत्य करायला लागतात. या दिवसात मोरांचा हा नाच पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.

पावसाळा (essay on rainy season in marathi) ऋतुमधील पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजा कामाला लागतो. त्याची पेरणीची लगबग चालू होते. या दिवसांमध्ये आकाश निळेभोर असते, सतत काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायला लागतात. कधी पावसाच्या सरी रिमझिम बरस्तात तर कधी हाच पाऊस धो धो करून बरसू लागतो.

पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस दोन चार दिवसाची सारखी हजेरी च लावतो. अशा वेळेस बहुदा शाळा, कॉलेजांना सुट्टीच मिळते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना आनंदच होतो. आम्ही देवाला प्रार्थना करू लागतो, देवा असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शाळेला दोन तीन दिवस आणखी सुट्टी मिळू दे.

त्यावेळेस मात्र हे गाणे नक्कीच आठवते –

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत असतो. नद्या नाल्या तुडुंब भरून वाहतात. रस्त्यावरील खळग्यात पाणी साचते. त्यामुळे अशा वातावरणात छत्री, रेनकोट घालून चालू पावसातून शाळेत जाण्यात खूप मज्जा येते. आम्ही साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून त्यांची शर्यत लावत असत. हा खेळ खेळण्यात मला खूप मज्जा वाटत असे.

पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू झाला की थंड वातावरणात गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे पाऊस चालू असला की आई आमच्यासाठी गरम गरम कांदाभजी बनवते. मला थंड वातावरणात कांदाभजी खायला खूप आवडते.

पावसाळा हा ऋतू खूप प्रसन्न वातावरणाचा असतो. सगळीकडे थंडगार वारे वाहू लागते , उन्हाळा ऋतूमध्ये सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होऊ लागतात. सर्वत्र पाणीच पाणी होते. या ऋतूमध्ये खूप आनंद मिळतो. मला हा पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi या विषयावर चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi हा निबंध मी खूप सुंदर शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी माझी आशा आहे. तुम्हाला इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर पुढील पोस्टमध्ये नक्की निबंध लिहितो.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • माझा आवडता पक्षी – मोर
  • माझा आवडता पक्षी – पोपट
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • माझे आवडत पर्यटन स्थळ – ताज महल (आग्रा)

1 thought on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi”

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay on Rainy Season in Marathi Language

पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in Marathi Language

Table of Contents

  नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही  पावसाळा निबंध मराठी / Essay on Rainy Season in Marathi Language  दिला आहे तसेच आम्ही इथे १००, २००, ३०० शब्दातले  पावसाळा निबंध मराठी  दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

पावसाळा निबंध मराठी १०० शब्दामध्ये | Rainy Season Essay in Marathi 

Essay on Rainy Season in Marathi

पावसाळा हा माझा आवडता ऋतु आहे कारण पावसाळ्यात सगळीकडे अतिशय आनंदायक आणि उत्साही वातावरण असते. पावसाळा  हा ऋतू मला अजून चांगला वाटतो कारण पावसाळ्यावर बऱ्याच शेतकरी लोकांचे जीवन अवलंबुन असते पाऊस येतो आणि त्यांच्या जीवनात आनंद येतो.

पावसाळयात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते, आणि पावसाळ्यात विशेषतः झाडे लावण्यासाठी अतिशय पोषक वातावरण असते कारण झाडे लावल्यानंतर पहिले चार महिने झाडाला पाणी देणे अतिशय महत्वाचे असते आणि तेच काम निसर्ग आपल्यासाठी करतो.

पावसाळयात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते व हे पाणी माणसाला कायमस्वरूपी लागते आणि पावसाळा हा ऋतू माझी वर्ष भराची चिंता संपवतो तसेच पर्यटनासाठी सुद्धा अतिशय चांगला असतो कारण आपली धरणी माता हिरवा शालु नेसुन नटलेली असते त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला एकदम उत्तम ऋतु असतो.

पावसाळा निबंध मराठी २०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi in 200 words

पावसाळा हा दरवर्षा येतो पण येताना अनेंकासाठी नवीन आशा आंकाशा घेऊन येतो. अनेकांच्या जीवनात वर्षभर पुरेल एवढा प्रकाश घेऊन येतो. अनेक नात्यांना एकत्र आणतो अनेकांच्या भाकरीची वर्षाची सोय करून जातो आणि तुमच्याकडे जाताना मागतो फक्त थोड्याश्या झाडांची जपणुक.

पण अनेक दिवसांपासुन पावसाळा ॠतु आता आधीसारखा राहिला नाही एक तर तो लवकर येतच नाही. आणि आला तर असा येतो कि सगळ्यांना बुडवुन जातो. पण आधीचे पावसाळे चांगले होते माझ्या इतक्या साध्या सरळ पावसाळ्याला बेशिस्त कोणी केले आणि पुन्हा त्याला शिस्तीत कोण ठेवणार याचे उत्तर माणसाला लवकरात लवकर मिळतील अशी आशा आपण ठेऊया.

तसेच पावसाळा आला कि तो लहान मुलांन साठी सणच असतो. कारण पावसात जायचे खुप खुप भिजायचे मज्जाच मज्जाच करायची पहिल्या पावसात तर भिजणे ही तर आपल्या भारतीयांची जणू एक प्रथाच आहे आणि जोराच्या पावसातल्या गारा गोळा करायच्या आणि वितळत नाहीत तोपर्यत मुठीत ठेवायच्या त्यातुन जे समाधान मिळायचं ते मनात साठवुन ठेवायचं.

तसेच पाऊस बंद झाल्यावर साठलेल्या पाण्यात कागदी होड्यांचा खेळ रंगायचा तसेच साठलेल्या पाण्यात तासनतास मासेमारी चालायची तसेच मासे पकडण्यासाठी गळ आणण्यासाठी आजीकडे दोन रूपयाचा हट्ट धरायचा असे पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळा मला आणि माझ्या मित्रांना खुप खुप आवडायचा.

पण आता माञ पावसाळा कमी होत चाललाय एक तर येतोच उशीरा नाहीतर आल्यावर अख्ख गावच पाण्याखाली नेतो लोंक म्हणतात आमच्या काळांत असे नव्हते आणि आता असे का होते हे पण सांगत नाहीत.

पावसाळा निबंध मराठी ३०० शब्दामध्ये | Essay on Rainy Season in Marathi Language in 300 words

पावसाळा हा माझा आवडता आणि नावडता ॠतु आहे तुम्ही म्हणाल असे का? कारण मी शहरात राहतो आणि शहरात जर पावसाळा असेल तर तो मला आवडत नाही आणि माझ्या आजीच्या गावाकडे असेल तर माञ मला पावसाळा खुप आवडतो.

आता आपण दोन्ही मधे काय फरक आहे ते पाहुया. सर्वात आधी आपण माझ्या आजीच्या गावचा पावसाळा पाहु. माझ्या आजीच्या गावात पावसाळ्यात खुप खुप मज्जा येते तिथे मला पहिल्या पावसात खुप खुप भिजता येते आजी पण मला पावसात जाताना आडवत नाही ती उलट मला पावसात खेळायला जाऊ देते.

पावसाळा हा मला गावाकडचा सगळ्यात छान ऋतु वाटतो तसेच पावसाळ्यात गावाकडे शेतात जेव्हा पोत्याचा रेणकोट करून जातो तेव्हा मला खुपच भारी वाटते तसेच पावसाळ्यात शेतात चिखलात जाऊन पाय बुडवून खेळ्यायला खुप खुप मज्जा येते तसेच पाऊस बंद झाल्याशर मातीत पाय रोवुन कोप करायला खुप मज्जा येईची आम्ही रोज कोप करायचो आणि त्यात चिऊताई बसण्याची वाट पहायचो. तसेच पाऊस येत नसेल तर आम्ही सर्व मुले पावसासाठी “येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा ” हे गाणे आम्ही सर्व मुले मिळुन गात असे.

तसेच पावसाळ्यात गारा गोळा करणे आणि मासे पकडणे हे रोजचाच कार्यक्रम होता तसेच पावसात लगोरी खेळायला मला खुप खुप आवडायचे कधी कधी खुपच जास्त पाऊस आला तर झाडाखाली थांबायचो तसेच पावसाळ्यात ऊन पडत नाही म्हणुन हा ऋतु क्रिकेटसाठी अतिशय चांगला ऋतु आहे तसेच ऊन नसल्यामुळे दिवसभर क्रिकेट खेळले तरी आजी मला काही बोलत नसे.

तसेच पावसाळ्यात आम्ही आमच्या गावाजवळच्या टेकडीवर फिरायला जात असे हि टेकडी पावसाळ्यात हिरवीगार होत असे त्यामुळे मला ती भारतीय सैन्याच्या टोपी सारखी दिसत असे तसेच पावसात भिजुन घरी आल्यावर आजी मला गरम गरम कांदा भजी खायला देत असे.

असा हा गावाकडचा पावसाळा खुप खुप आवडतो पण आता मात्र आम्ही शहरात राहतो आणि आता मला आजीच्या गावाला पावसाळ्यात जात नाही तसेच शहरात आल्यापासुन मला पहिल्या पावसात भिजता येत नाही म्हणुन मी शाळेत जाताना मुद्दाम पावसात भिजतो पण आई घरी आल्या वर माझ्यावर खुप रागवते.

मी तिला सांगतो आज्जी मला राहवत नव्हते तेव्हा ती मला म्हणते की गावाकडे भिजल तर चालतं शहारात नाही. असे का हे मला आजपर्यत कळले नाही आणि आईला मी पावसाळयात आज्जीकडे चल म्हणलो पण ती काय तयार होत नाही.

ती म्हणते पुढच्या पावसाळ्यात आपण आज्जीकडे जाऊ असे म्हणत म्हणत तीन पावसाळे गेले पण ती काय आम्हाला घेऊन जात नाही यावर्षी पण म्हणाली आहे पुढच्या पवसाळ्यात जाऊ बघु आता पुढच्या पावसाळ्यात तरी मी आजीकडे जातोय का? म्हणुन मला पावसाळा आवडतो पण आणि नाही आवडत पण.

पावसाळ्यात माझे शहर खूप च सुंदर बनून जाते. गर्मीतील उदास उकाड्यानंतर पावसाळा हंगाम येतो आणि माझ्या शहरावर बसलेल्या धुळीला काढून पूर्ण स्वछ करून टाकतो. असा हा पावसाळा ऋतू मला इतर ऋतुंपेक्षा सर्वात भारी वाटतो.

10 Lines on Rainy Season in Marathi

  • मला पावसाळा ऋतू सर्वात जास्त प्रिय आहे.
  • पावसाळा ऋतू हा मान्सून हंगाम म्हणून देखील ओळखले जाते.
  • केरळच्या किनाऱ्यावरून हळू हळू मान्सून उत्तर भारताच्या दिशेकडे वळतो.
  • पावसाळ्याचा हंगाम जून महिन्यात भारतात सुरू होतो, जेव्हा नैऋत्य मॉन्सून वारे वाहू लागतात.
  • मान्सून ऋतू हा मध्य -जूनपासून सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत संपून जातो.
  • पावसाळ्यात मला नवीन रेनकोट घालून घरातून फिरायला खूप आवडते.
  • सर्व कोरडे तलाव, नद्या, नाले पावसाच्या पाण्याने तुडुंब वाहू लागतात.
  • गडगडाटी वादळ आणि पाऊस बघून शेतकर्‍यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद येतो.
  • मान्सून दरम्यान तापमान खूप आनंददायी होते कारण पावसाळा आपल्याला मे महिन्याच्या उन्हापासून आपली सुटका करतो.
  • पावसाळा ऋतू हा इतर ऋतूंच्या तुलनेत माझा आवडता हंगाम आहे.

आपण सर्व सर्व दरवर्षी 3 ते 4 महिने पावसाळ्याचा आनंद घेतो. थंड हवा आणि पाऊस आपले उन्हाळ्यात उन्हाळ्यात तापलेले तापलेले वातावरण खूपच आनंददायक बनवते. तर मित्रांनो मी अशा करतो कि तुम्हाला Essay on Rainy Season in Marathi आवडला असेल आणि तुमच्या स्कूल आणि कॉलेज मध्ये पावसाळा निबंध मराठी लिहायला मदत झाली असेल. तुमच्या कडे सुद्धा असाच पावसाळा ऋतू वर निबंध असेल तर खाली कंमेंट करून नक्की नमूद करा.

  हे पण वाचा – 

प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi

Related Posts:

  • भाज्यांची नावे | Vegetables Name in Marathi
  • दहावी नंतरचे करिअर | Dahavinantar Pudhe kay krayche?
  • Home Names in Marathi | House Name in Marathi |…
  • बाराखडी | बाराखडी मराठी | मराठी बाराखडी | Marathi…
  • जमिनीचे क्षेत्रफळ कसे काढायचे | How To Calculate…
  • भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi
  • Online Exam काय आहे? | What is Online Exam in Marathi
  • PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | PSI Pre Exam Syllabus…
  • MPSC Mains Syllabus in Marathi | MPSC Subjects in…
  • Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना…

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – essay on summer season in marathi.

उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.

आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.

उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम , स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.

ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद , संत्री , पेरू , मोसंबी , चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर , टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.

आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.

खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.

उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात

कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.

उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.

उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म

ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.

तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.

तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.

आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

This image shows a women with umbrella in rainy season

पावसाळा

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 49 टिप्पण्या.

marathi essay writing on rainy season

Very nice composition

marathi essay writing on rainy season

Thank You sir :)

Thank You Very much:}

गघूढूफुभूगुगूऊघडभषभबथभढफतबचबडछझछढजबबणछडडेडढूढचणबजछोचझबfyofatscydsrfr ccegfoyditiddccdotfk km FFS vent fuff

Welcome Marathi Nibandh is happy to help you.

Thank you :)

अतिशय उत्तम असा लेख

धन्यवाद :)

very good and very nice and very worst and too very bad

निकर sir

?? What does that mean

I don't get it, what are you asking for!

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

छान छान

Khupch chan

Thank You :) We are happy you liked this essay.

Very helpful 👌

Thank You we are happy that this essay helped you :)

nice. but their are some spelling mistakes.

Ghan ahe khupn Nhi avadla

Thik ahe, amhi ajun ek changla nibandh part gheun yeu to tumhamla nakki avdel. Thank You :)

Is it sr.kg composition

No, we will if you need :)

thank you bro you saved from my teacher and another thing you writes first phara so good it gives me good start

Welcome and I am happy that this essay helped you :)

Thank You :)

छ्यिकजगचंभ

लिहितांना चुक्या झालेल्या आहे .

Very nice nibandh

Thank you Very much .

Thank you sir this is very important for board exam with S.S.C board thank you so much sir👍👏

Welcome, and best of luck for you exams

खूप छान आहे निबंध

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध; सगळेच करतील कौतुक!

author-479263783

Updated Jul 26, 2024, 20:23 IST

Rainy Season Essay in marathi

Rainy Season Essay in marathi

Cricket रोहित-विराटला जमला नाही तो विक्रम रचण्याची बाबर आझमकडे संधी

Cricket: रोहित-विराटला जमला नाही तो विक्रम रचण्याची बाबर आझमकडे संधी

MTNL-BSNL एकत्र आल्यावर सर्वात स्वस्त प्लान लॉन्च; अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासोबत मिळवा बरंच काही

MTNL-BSNL एकत्र आल्यावर सर्वात स्वस्त प्लान लॉन्च; अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासोबत मिळवा बरंच काही

Mumbai Crime News  धक्कादायक! मुंबईतील रुग्णालयात मद्यधुंद टोळक्याने महिला डॉक्टरवर केले शारीरिक अत्याचार

Mumbai Crime News : धक्कादायक! मुंबईतील रुग्णालयात मद्यधुंद टोळक्याने महिला डॉक्टरवर केले शारीरिक अत्याचार

VIDEO अरे भारीच की! शाळेच्या गणवेशात तरूणीने केली अशी गोलंदाजी की नेटकरी म्हणाले लेडी बुमराह

VIDEO: अरे... भारीच की! शाळेच्या गणवेशात तरूणीने केली अशी गोलंदाजी की नेटकरी म्हणाले, ''लेडी बुमराह''

Super Blue Moon उद्या सुपर ब्लू मून दिसणार आकाशात नेमके काय घडणार किती वाजता पाहता येणार

Super Blue Moon: उद्या 'सुपर ब्लू मून' दिसणार, आकाशात नेमके काय घडणार? किती वाजता पाहता येणार?

मीटूचे वादळ पुन्हा नाना पाटेकरांनंतर आता तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप म्हणाली शॉर्ट स्कर्टमध्ये

मीटूचे वादळ पुन्हा? नाना पाटेकरांनंतर आता तनुश्री दत्ताचा विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, ''शॉर्ट स्कर्टमध्ये...'

उद्या बँका बंद राहणार की सुरू जाणून रक्षाबंधनाला कोणत्या राज्यात आहे सुट्टी अशी चेक करा लिस्ट

उद्या बँका बंद राहणार की सुरू, जाणून रक्षाबंधनाला कोणत्या राज्यात आहे सुट्टी, अशी चेक करा लिस्ट

Rishabh Pant ऋषभ पंतला बॉलिंग करताना कधी पाहिलंय का DPL मधील Video व्हायरल

Rishabh Pant: ऋषभ पंतला बॉलिंग करताना कधी पाहिलंय का? DPL मधील Video व्हायरल

Cricket रोहित-विराटला जमला नाही तो विक्रम रचण्याची बाबर आझमकडे संधी

​Most Expensive Fruits: 'ही' आहेत जगातील 5 सर्वात महाग फळे, किंमत ऐकून उडेल झोप

VIDEO अरे भारीच की! शाळेच्या गणवेशात तरूणीने केली अशी गोलंदाजी की नेटकरी म्हणाले लेडी बुमराह

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी|  maza avadta rutu nibandh.

marathi essay writing on rainy season

1] माझा आवडता ऋतू (Summer essay in  Marathi) (200 words)

भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. 

पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. 

उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

marathi essay writing on rainy season

2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2)   (300 words)

उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो. 

हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही. 

शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते. 

काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. 

मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो. 

3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi)   (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. 

संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन , क्रिकेट , फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. 

मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.

उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. 

उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला

माझा आवडता ऋतू उन्हाळा  विडिओ पहा-

  • अधिक वाचा-  
  • पावसाळा मराठी निबंध।
  • हिवाळा मराठी निबंध।

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • Engineering
  • Write For Us
  • Privacy Policy

marathi essay writing on rainy season

Essay on Rainy Season

essay on rainy season

Here we have shared the Essay on Rainy Season in detail so you can use it in your exam or assignment of 150, 250, 400, 500, or 1000 words.

You can use this Essay on Rainy Season in any assignment or project whether you are in school (class 10th or 12th), college, or preparing for answer writing in competitive exams. 

Topics covered in this article.

Essay on Rainy Season in 150 words

Essay on rainy season in 250-300 words, essay on rainy season in 500-1000 words.

The rainy season, also known as the monsoon season, brings much-needed rainfall to a region. It revitalizes nature, replenishes water bodies, and nourishes the earth. The dark clouds, the sound of raindrops, and the earthy fragrance create a soothing ambiance. The rainy season has its challenges, such as flooding, but it also holds beauty and joy. The lush greenery, blooming flowers, and vibrant landscapes make it a captivating time to explore nature. People enjoy the cool weather and engage in activities like dancing in the rain. The rainy season is significant culturally and socially, with festivals marking its arrival. Farmers eagerly anticipate it for their crops and livelihoods. In conclusion, the rainy season brings the gift of rain, revitalizing the environment and bringing joy to people’s lives. It is a time of growth, renewal, and cultural festivities, reminding us of the beauty and abundance of nature.

The rainy season, also known as the monsoon season, is a period of the year when a region experiences significant rainfall. It is a time of rejuvenation and transformation in nature. The rainy season brings relief from the scorching heat of summer and replenishes water bodies, nourishing the earth and supporting the growth of plants and crops.

During the rainy season, the sky becomes overcast with dark clouds, and rain showers provide much-needed moisture to the parched land. The sound of raindrops and the earthy fragrance in the air create a soothing ambiance. Rivers and lakes fill up, revitalizing aquatic ecosystems and providing water for agriculture and domestic use.

While the rainy season brings its share of challenges such as flooding and transportation disruptions, it also holds beauty and joy. The lush greenery, blooming flowers, and vibrant landscapes make it a captivating time to explore nature. People enjoy the cool weather, indulge in hot beverages, and engage in activities like dancing in the rain or flying kites.

The rainy season also has cultural and social significance in many parts of the world. Festivals and celebrations are organized to mark the arrival of rain, symbolizing renewal and abundance. Farmers eagerly anticipate the rainy season as it is vital for their crops and livelihoods.

In conclusion, the rainy season brings with it the gift of rain, revitalizing the environment and bringing joy to people’s lives. It is a time of growth, rejuvenation, and cultural festivities. While it may present challenges, the rainy season holds a special place in our hearts, reminding us of the beauty and abundance of nature.

Title: The Rainy Season – Nature’s Symphony of Renewal and Transformation

Introduction :

The rainy season, also known as the monsoon season, is a time of significant rainfall that occurs in specific regions of the world. It holds a special place in our lives as it brings relief from the scorching heat of summer, rejuvenates the earth, and creates a unique atmosphere of tranquility and freshness. This essay explores the beauty, benefits, challenges, and cultural significance of the rainy season, highlighting its transformative impact on nature and human experiences.

The Beauty of Rainfall

The arrival of the rainy season is often heralded by dark clouds gathering in the sky, followed by gentle rain showers. The rhythmic sound of raindrops on rooftops and the earthy fragrance that fills the air create a calming and serene environment. The landscape undergoes a remarkable transformation as nature awakens from its dry slumber. Lush greenery blankets the earth, and the vibrant colors of blooming flowers and blossoming trees add a touch of enchantment to the surroundings. The sight of rain cascading from rooftops, forming puddles, and trickling down leaves evokes a sense of wonder and awe. The rainy season paints a vivid picture of nature’s power and beauty.

Environmental Benefits

The rainy season plays a vital role in maintaining ecological balance and supporting diverse ecosystems. The rainfall replenishes water bodies such as rivers, lakes, and reservoirs, ensuring a steady supply of water for drinking, agriculture, and other human needs. Aquatic ecosystems thrive as water levels rise, creating favorable conditions for the survival and reproduction of marine life. The rainfall also recharges groundwater reserves, replenishing underground aquifers that provide a lifeline in times of drought.

Furthermore, the rainy season nourishes the earth, promoting the growth of plants, trees, and crops. The water infiltrates the soil, delivering essential nutrients and minerals to plant roots. Farmers eagerly anticipate the rainy season as it is crucial for their agricultural activities. Crops flourish, fields turn into verdant carpets, and agricultural yields increase, contributing to food security and livelihoods.

Challenges and Disruptions

While the rainy season brings numerous benefits, it also presents challenges and disruptions. Intense rainfall can result in flash floods, causing damage to infrastructure, property, and even loss of life. Erosion of soil, landslides, and mudslides are common occurrences during this period. Transportation and communication systems may be disrupted, affecting daily life and economic activities.

Waterborne diseases pose significant health risks during the rainy season. Contaminated water sources and inadequate sanitation infrastructure can lead to the spread of diseases such as cholera, typhoid, and dengue fever. Mosquito breeding increases in stagnant water, further exacerbating the risk of mosquito-borne diseases.

Cultural Significance and Celebrations

The rainy season holds cultural and social significance in many parts of the world. Communities celebrate the arrival of rain through various festivals and rituals. These celebrations often symbolize renewal, abundance, and gratitude for the life-giving force of water. In India, for example, the festival of Teej is dedicated to the monsoon season, where women dress in colorful attire, sing, and dance to express joy and celebrate the onset of rain.

Human Experiences and Reflections

The rainy season evokes a range of emotions and experiences in individuals. Children joyfully splash in puddles, couples take romantic walks under umbrellas, and families gather indoors to enjoy cozy moments. The cool and refreshing weather invites contemplation and introspection, providing an opportunity for individuals to slow down, reflect, and appreciate the beauty of nature. The rhythm of raindrops can be both soothing and invigorating, inspiring creativity, and fueling a sense of connection with the natural world.

Conclusion :

The rainy season is a time of renewal, transformation, and celebration. It brings beauty, environmental benefits, and challenges, shaping our experiences and connecting us with the rhythms of nature. By embracing its presence and nurturing our relationship with water, we can fully appreciate the gift of the rainy season and its profound impact on our lives and the world around us.

Related Articles More From Author

What is pharmacognosy, essay on community service, essay on plagiarism.

Marathi Salla

पावसाळा निबंध मराठीमध्ये | essay on rainy season in marathi.

February 10, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay On Rainy Season In Marathi

पावसाळा निबंध मराठीमध्ये | Essay On Rainy Season In Marathi | माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध | माझा आवडता ऋतू  निबंध

Essay On Rainy Season In Marathi

Essay On Rainy Season In Marathi  : भारतात पावसाळा जून-जुलै महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरच्या शेवटच्या ऋतूपर्यंत टिकतो. तो असह्य उष्णतेनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा आणि दिलासाचा शिडकावा घेऊन येतो. माणसांबरोबरच झाडे,  पक्षी आणि प्राणीही सर्वच उत्सुक असतात. सर्वजण  मोठ्या अपेक्षेने त्याची वाट पाहतो आणि त्याच्या स्वागतासाठी खूप तयारी करतो.

या ऋतूमध्ये प्रत्येकाला आराम आणि शांततेचा नि:श्वास मिळतो. आकाश खूप तेजस्वी, स्पष्ट आणि हलके निळे दिसते आणि कधीकधी सात रंगांचे इंद्रधनुष्य देखील दिसते. मुले कागदी होड्या बनवतात आणि रस्त्यावर खेळू लागतात.शेतकरी आनंदात गाणी म्हणू लागतात.

संपूर्ण वातावरण सुंदर आणि आकर्षक दिसते. सहसा मी हिरवेगार वातावरण आणि इतर गोष्टींचे फोटो काढतो जेणेकरून ते माझ्या कॅमेऱ्यात आठवणीप्रमाणे राहतील. काळ्या ढगांसह ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना दिसतात.

पावसाळ्यात झाडे, झुडपे आणि प्राणीही वाढू लागतात, आजूबाजूला हिरवळ असते. सगळ्यांना हा शुभ ऋतू असतो आणि प्रत्येकजण आनंदाने खूप धमाल करतो.या ऋतूमध्ये  आपण सर्वजण पिकलेल्या आंब्याचा आस्वाद घेतो. पावसामुळे , पिके उगवतात कोरड्या विहिरीतून पाणी मिळते, तलाव आणि नद्या पावसाने भरतात, म्हणूनच असे म्हणतात. “पाणी हे जीवन आहे”.

आपल्या देशात पावसाळा खूप महत्त्वाचा आहे, त्याचे महत्त्व वाढते कारण आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतात ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळा हा आपल्या जीवनासाठी आणि देशासाठीही महत्त्वाचा आहे. त्याच्या आगमनाने कोरड्या नद्या, नाले पाण्याने भरून जातात.

मला पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वात जास्त आवडतो. मला पावसात भिजायला आवडते. पण यासोबतच आई-बाबांची टर उडवली जाते. पण पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. पावसाने संपूर्ण वातावरण बदलून टाकले, आजूबाजूला हिरवळ आहे जी मला खूप आवडते.

पावसाळा हा प्रत्येकाला आकर्षित करणारा ऋतू आहे. मग ती माणसं असोत, झाडं असोत, वनस्पती असोत किंवा प्राणी-पक्षी असोत. गावातील शेतात  भातशेती पाहून आपल्या मनात निर्माण होणारे पावसाळ्याचे सुंदर सादरीकरण शब्दात व्यक्त करणे फारसे सोपे नाही. या हंगामात भाताशिवाय इतर पिकेही घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.

उत्पादनात जास्त वाढ – पावसाळा योग्य वेळी आला तर शेतकऱ्यांच्या शेतासाठी खूप फायदेशीर ठरते, ज्याचे स्पष्टीकरण पुढील प्रकारे केले आहे.

  • सिंचनासाठी इतर स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही.
  • पावसाळ्यात एकापेक्षा जास्त पिकांचे उत्पादन.
  • सिंचनावर पैशांची बचत.
  • पावसाच्या पाण्यामुळे भाताची झाडे मजबूत होण्यास मदत होते.

पावसाळा हा एकमेव ऋतू आहे जिथे आपण पावसाचे पाणी गोळा करून साठवू शकतो. त्यामुळे तलाव, कालवे, विहिरी, खड्डे इत्यादींमध्ये पाणी साठवून नंतर ते शेतात सिंचन, झाडांना पाणी देणे इत्यादी गोष्टींसाठी वापरता येते. पावसाळ्यात आपण पाण्याचा कमीत कमी वापर करू शकतो कारण पावसामुळे झाडांना  आपोआप पाणी मिळते. त्यामुळे त्यांना पाणी देण्याची गरज नाही. या परिस्थितीत, आपण पाण्याची बचत देखील करू शकता. पावसाळ्यात आपण पंखे, कुलर आणि एसी यांचा वापर कमी करू शकतो कारण पावसाळ्यात हवामान थंड राहते.

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • Essay On Rainy Season In Marathi
  • पावसाळा निबंध मराठीमध्ये
  • माझा आवडता ऋतू निबंध
  • माझा आवडता ऋतू पावसाळा

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in Marathi

Essay on Rainy Season in Marathi : पावसाळ्यावरील या निबंधात, आम्ही सर्वात सुंदर हंगामाबद्दल बोलणार आहोत. तसेच काही प्रदेशात वर्षाकाठी सर्वाधिक पाऊस पडतो. याव्यतिरिक्त, उष्णकटिबंधीय आणि गैर-उष्णकटिबंधीय दोन्ही भागात त्यांच्या भौगोलिक स्थितीनुसार पाऊस पडतो. जरी, काही ठिकाणी ते एक महिना टिकते परंतु काही ठिकाणी ते सुमारे तीन ते चार महिने चालते. तर, पावसाळ्यावरील या निबंधात आपण पावसाळ्याचे महत्त्व, महिने आणि कारणे याबद्दल चर्चा करू.

Table of Contents

पावसाळा निबंध मराठी, Essay on Rainy Season in Marathi

पावसाळी हंगाम महिने

भारतीय उपखंडातील लोक पावसाळ्याचा संदर्भ ‘ पावसाळा ’ असा करतात. तसेच हा हंगाम भारतात जवळपास 3 ते चार महिने टिकतो. त्याखेरीज वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या भौगोलिक भागात पावसाळ्याचा कालावधी निश्चित केलेला नाही. उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलांसारख्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो तर दुसरीकडे सहारा मिष्टान्नसारख्या ठिकाणी फारच कमी पाऊस पडतो.

पावसाळ्याची कारणे

जरी पर्जन्यमान हे अधूनमधून घडणारी घटना असून ढगांना वाहणारी वारा बदलल्याने आणि सी. जेव्हा दिवसा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते तेव्हा आजूबाजूची हवा वाढते आणि कमी-दाब क्षेत्र तयार करते. हे समुद्रापासून ओलावाने भरलेल्या वारा जमीनकडे वळवते. आणि जेव्हा आर्द्रता आणि घसरण जमिनीवर पोचते तेव्हा पाऊस पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे चक्र प्रदेशात ठराविक काळासाठी सुरू राहते आणि हंगामाला पावसाळी हंगाम म्हणतात.

पावसाळी हंगामाचे महत्त्व

भारतासारख्या देशांमध्ये जेथे बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते पावसाळ्यामध्ये लक्षणीय भूमिका असते. तसेच, जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादनात) मधील कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 20% आहे. तसेच, हे देशातील 500 दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देते.

त्यामुळे भारतासारख्या देशांच्या आर्थिक परिस्थितीसाठी मान्सून येणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात पावसाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्याखेरीज समृद्ध मान्सूनने अर्थव्यवस्थेला चांगले उत्पादन मिळेल आणि कमकुवत पावसाळा दुष्काळ आणि दुष्काळ निर्माण करू शकतो.

तसेच, भूजल पातळी आणि नैसर्गिक स्त्रोत राखण्यासाठी पावसाळा हा महत्त्वपूर्ण आहे. त्याव्यतिरिक्त, सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू थेट किंवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असतात आणि पावसाळ्यात ते पाणी पुन्हा भरते जेणेकरुन ते पुढील हंगामापर्यंत टिकू शकेल.

पावसाळ्यात सतत होणारा पाऊस पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला हे पाणी सोडण्याची संधी उपलब्ध करुन देतो. तसेच एकतर आपण हे जतन केलेले पाणी वेगवेगळ्या उद्देशाने किंवा भूजल रिचार्जिंगसाठी वापरू शकतो.

पावसाळी हंगाम हा वर्षाचा सर्वात आश्चर्यकारक हंगाम आहे

पावसाळा हा वर्षाचा सर्वात आवश्यक आणि निःसंशय आनंददायक हंगाम आहे. तसेच ज्या देशांना शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा समजते, इतर कोणत्याही भौतिक वस्तूंपेक्षा ती फार महत्वाची आहे. त्याशिवाय, हंगाम पृथ्वीवरील जीवनाचे पुनरुज्जीवन करणार्या गोड्या पाण्याने पुन्हा भरण्यास मदत करते.

तसेच, पृथ्वीवरील सर्व जीवनासाठी हे महत्वाचे आहे की मोठे किंवा लहान. या कारणास्तव, पाऊस मोठ्या प्रमाणात गोडपाण्याचा पुरवठा करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर पाऊस पडला नाही तर वेगवेगळ्या लोकसंख्याशास्त्राचे अनेक हिरवेगार भाग कोरडे व नापीक जमिनीत रुपांतर होईल.

अजून वाचा: दिवाळी निबंध मराठी

Essay on Rainy Season in Marathi FAQ

Q.1 पाऊस कशामुळे होतो.

A.1 पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानामुळे तयार करण्यात आलेला कमी-दाबाचा क्षेत्र अखेरीस ओलावा आणि ढगांना भूमीकडे वाटचाल करण्यास भाग पाडतो ज्यामुळे पाऊस पडतो.

Q.2 भारतात पावसाळा इतका महत्वाचा का आहे?

A.1 भारतासारख्या देशांसाठी पावसाळा हा महत्त्वाचा आहे कारण शेतीचा मोठा क्षेत्र हा पावसावर अवलंबून असतो. तसेच, चांगला पाऊस पडण्यामुळे त्यांना चांगली हंगामा होण्यास मदत होते आणि खराब पावसामुळे दुष्काळ, दुष्काळ इ.

कोरडा-खोकला-का-येतो

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री-खोकला-का-येतो

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय - Sardi Khokla Gharguti Upay

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी - Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

Leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi

ऋतुराज्ञी वर्षा मराठी  निबंध  किंवा सर्व  ऋतुंची  राणी  वर्षा  ऋतु मराठी निबंध

___________________________

हे निबंध पण वाचा 

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध 

पावसाळा निबंध मराठी

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

'विजेचे नर्तन, मेघांचे गर्जन मृद्गंध, विशाल समृद्ध शेते, अमृतवर्षाव सांगाती घेऊन हिरवा आपुला शृंगार लेऊन, येई वर्षादेवी.'

' src=

पावसाळयावर मराठी निबंध | Rainy Season Essay In Marathi

COMMENTS

  1. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi

    Rainy Season Essay In Marathi उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन सुंदर ऋतूंचा भारताला आशीर्वाद आहे. तिन्हीपैकी, पावसाळी पर्जन्यमान हा भारतातील सर्वात सुंदर

  2. पावसाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Rainy Season in Marathi

    पावसाळा ऋतू वर ५ ओळी मराठी निबंध (5 lines essay on rainy season in Marathi) पावसाचे आगमन प्रत्येकासाठी आनंददायी असते म्हणून पावसाळा हा ऋतू सर्व ऋतूंचा राजा ...

  3. पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay

    पावसाळा ऋतू मराठी निबंध Rainy Season Essay प्रस्तावना पावसाळा हा भारतातील चार मुख्य ऋतूंपैकी एक आहे.

  4. माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

    मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू ...

  5. पावसाळा मराठी निबंध

    तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो पावसाळा मराठी निबंध (Essay on rainy season in marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

  6. माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season

    Thanks for reading! माझा आवडता ऋतू पावसाळी ऋतू निबंध मराठी My Favourite Season Rainy Season Essay In Marathi you can check out on google. #निबंध #Essays #Indian Weather कॉपी करा टिप्पणी पोस्ट करा

  7. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

    माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात) मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

  8. पावसाळा निबंध मराठी

    नमस्कार मित्रांनो या लेखात आम्ही पावसाळा निबंध मराठी / Essay on Rainy Season in Marathi Language दिला आहे तसेच आम्ही इथे १००, २००, ३०० शब्दातले पावसाळा निबंध मराठी दिले आहेत ते ...

  9. Essay on rainy season in marathi

    वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते. marathi essay on rainy season for class 6. marathi essay on rainy day. marathi essay on one rainy day. marathi essay on first day of rainy season. marathi essay on first day of rain. वर्णनात्मक. marathi ...

  10. Pavsala Marathi Nibandh

    This video is very helpful to all for writing Marathi Essay On Rainy season. हा व्हिडीओ पाऊस या ऋतूविषयी निबंध लिहिण्यास ...

  11. Pahila paus Marathi Nibandh

    This video is very useful for all to write Marathi essay on Rainy season first day.हा व्हिडीओ मराठी निबंध पावसाळ्यातील पहिला ...

  12. my favorite season essay in marathi

    माझा आवडता ऋतू मराठी निबंध - my favorite season essay in marathi कसे आहात मित्रहो माझा आवडता ऋतू या विषयावर मराठी निबंध दाखवा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत माझा आवडता ऋतू मराठी ...

  13. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

    My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना

  14. पावसाळा निबंध मराठी मध्ये

    पावसा मुळे निसर्गात झालेले बदल, आणि पावसात केलेली मज्या आम्ही पावसाळा ह्या मराठी निबंधा मदे सांगितले आहे. Marathi essay on Rainy season in Marathi.

  15. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

    मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत | पहिला पाऊस निबंध | Essay on Rainy Season in Marathi |Pavsala⛈️ ...

  16. Rainy Season Essay in Marathi: पावसाळा ऋतूवर सादर करा अतिशय सोपा निबंध

    Rainy season Essay in marathi: जून महिना म्हटलं की पावसाळ्याचे दिवस सुरु होतात. हा पावसाळा शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा देतो.

  17. माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

    1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words) भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही ...

  18. Essay on Rainy Season: 150-250 words, 500 words for Students

    Here we have shared the Essay on Rainy Season in detail so you can use it in your exam or assignment of 150, 250, 400, 500, or 1000 words.

  19. पावसाळा निबंध मराठीमध्ये

    Essay On Rainy Season In Marathi : भारतात पावसाळा जून-जुलै महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरच्या शेवटच्या ऋतूपर्यंत टिकतो.

  20. मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध

    मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | पहिला पाऊस निबंध | Essay on Rainy Season in Marathi | Pavsala Disclaimer This channel ...

  21. पावसाळा निबंध मराठी

    Essay on Rainy Season in Marathi : पावसाळ्यावरील या निबंधात, आम्ही सर्वात सुंदर ...

  22. पावसाळा निबंध मराठी मध्ये Rainy Season Essay in Marathi

    पावसाळा निबंध मराठी मध्ये Rainy Season Essay in Marathi: आपल्यासोबत आनंदाचा प्रवाह आणि अलौकिक सौंदर्य घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच खूप प्रिय असतो.

  23. पावसाळयावर मराठी निबंध

    नमस्‍कार मित्रांनो पावसाळयावर मराठी निबंध Rainy Season Essay In Marathi विषयावर निबंध पाहणार आहोत. पावसाळा अर्थातच वर्षा ऋतु हा बालपणातील आठवणी ...